कविता परिचय धरतीची आम्ही लेकर-इयत्ता चौथी मराठी ही कविता द. ना. गव्हाणकर यांनी लिहिली आहे. शेतातील ही मुलं म्हणतात की ,आम्ही धरतीची भाग्यवान मुले आहोत.आम्ही शेतात जाऊन रानावनातील पाखरांसोबत गाणे गाणार. वर्षभर कष्ट केल्याचे फळ शेतात डोलत आहे.चमचमणाऱ्या शाळू व जोंधळ्याच्या भाकरी वर्षभर खाऊ.या ठिकाणी कोणी मालक नाही व कोणी मजूर नाही. ही आमच्या पोलादी एकता असून आम्ही समान आहेत. धरतीची आम्ही भाग्यवान लेकरे आहोत.
कवितेवरील व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही मुले आहोत ज्या जमिनीमुळे आपण आहोत जी जमीन आपल्याला अन्नधान्य देते त्या धरतीची आम्ही मुले आहेत आणि आम्ही फार भाग्यवान आहोत.मुले म्हणतात सकाळ होताच आम्ही शेतावर जाणार आहोत.रानावनातील रान पाखरांसोबत गोड गाणी गाणार आहोत.वर्षभर शेतात आम्ही कष्ट करतो.त्या श्रमाचे फळ आज मिळाले आहे.शेतात पिके डोलत आहेत.
शेतात मोठ्या प्रमाणे जोंधळा चमकत आहे चमकणाऱ्या शाळू व जोंधळ्याची भाकरी आम्ही वर्षभर खाऊ. धरतीची आम्ही लेकरे आहोत इथे कोणी मालक नाही आणि कोणी लोक करणार ही ही आमची एकता अखंड टिकणारी पोलादी आहे आम्ही सर्व एक आहोत आम्ही समानता स्थापन करणार आहोत.
कवितेवरील स्वाध्यायाचा व्हिडीओ पहा.
या मातीत जन्मले ली आम्ही धरतीची लेकरे आहोत नेहमी या धर्तीच्या सहवासात राहणारी आम्ही मुले खूप भाग्यवान आहोत आम्ही पाखरांसोबत गाणे गाणार आहेत आणि खूप खूप मज्जा करणार आहोत असेही आम्ही मुले धरतीची भाग्यवान मुले आहोत.